इतर

वरंध घाट 

वरंध घाट तथा वरंधा घाट पुण्याहून भोर मार्गे महाडकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर नावाचा २०-२५ किलोमीटर लांबीचा डोंगरी रस्ता आहे. हा घाट सह्याद्रीच्या उभ्या धारेवर असलेल्या कावळ्या किल्ल्याला दुभंगून देशावरून कोकणात उतरतो. घाटाच्या समोरच्या डोंगरकुशीत, गर्द झाडीत समर्थ रामदासस्वामींची शिवथरघळ आहे.घाटाच्या सुरुवातीला भोर तालुक्यातले हिरडोशी गाव आहे, मध्यात वाघजाई मंदिर आहे व उताराच्या शेवटाला कोकणातली माझेरी, वरंध आणि बिरवाडी ही गावे येतात. तेथून कोकणात अन्यत्र जाणारे रस्ते आहेत.
वाघजाई समोरचा एक भलामोठा डोंगर अजस्र शिवलिंगाच्या आकाराचा आहे. पावसाळ्यात त्याच्या चहुअंगावरून असंख्य धबधबे कोसळत असतात.
वाघजाईच्या पुढे लगेच एका खिंडीतून घाट डावीकडे वळतो. या खिंडीच्या दोन्ही अंगांचे डोंगर म्हणजेच कावळ्या ऊर्फ मनमोहनगड किल्ला आहेत. या गडाच्या वाघजाईकडील बाजूच्या डोंगरामध्ये नऊ खोदीव टाक्या आहेत. तर दुसर्‍या बाजूस अशाच काही टाक्या व शिबंदीच्या घरट्यांचे अवशेष दिसतात. इतिहासात फारसा परिचित नसलेल्या या गडावर प्राचीन काळापासून वाहत्या असलेल्या या घाटवाटेवर लक्ष ठेवण्याचे काम होते. अशी ही घाटवाट पुढे ब्रिटिशांनी इ.स. १८५७ मध्ये सव्वा लाख रुपये खर्चून पक्की केली.
कावळा गड